आषाढी व कार्तिकी एकादशी
संपूर्ण वर्षामध्ये एकूण चोवीस एकादश्या येतात. प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षात एक व अधिक मास असल्यास त्या दोन एकादश्या जास्त येतात. कार्तिकी एकादशी व आषाढी एकादशीमध्ये आषाढी एकादशीला जास्त महत्व आहे. या महिन्यात हवामान पावसाळी असते. पाऊस याच महिन्यात जास्त पडतो. आषाढी एकादशीस शायनी व कार्तिकी एकादशीस प्रबोधिनी असे म्हणतात. या एकादशीबद्दल एक कथा आहे -
मृदुमान्य राक्षसाने भगवान शंकरांची भक्तिपूर्वक आराधना केली. त्याचा भक्तिभाव पाहून भोलानाथ शंकर प्रसिद्ध झाले. त्यांनी मृदुमान्य राक्षसाला वर दिला कि, "तू कोणाकडूनही मारणार नाहीस. पण एका स्त्रीच्या हातून मारशील." असा वॉर मिळताच या राक्षसाचा मृदू पण नष्ट झाला. त्याने प्रथम देवांचा पराभव केला. परंतु शंकरानेच त्याला वर दिल्यामुळे कोणाचेच काहीच चालले नाही. सर्व देव व भगवान शंकर एका गुहेत लपले. त्यांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली. तिचे नाव एकादशी होते. तिने मृदुमान्याला ठार मारले. तेव्हा भरपूर पाऊस कोसळला. त्यामुळे देवांची अंघोळ झाली व भुयारात लपून बसल्यामुळे उपवासही झालाच. त्या दिवशीच्या घटनेपासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याची प्रथा सुरु झाली. या दिवशी लवकर उठून नदी किंवा समुद्रावर जाऊन स्नान करावे. आपल्या कुलदैवतांची व विष्णूची पूजा करून तुळशीपत्र वाहवीत. आषाढी एकादशीलामहाएकादशी म्हणतात. भागवत धर्मानुयायी वारकरी पंथात एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, सोपानदेव,निवृत्तीनाथ, एकनाथांच्या पालख्या व दिंड्या चंद्रभागेच्या काठी येतात. तेव्हा त्याला जत्रेचे स्वरूप येते. पंढरपूर म्हणचे भागवत धर्माचे आदिपीठ आहे. या पंढरपुरात भगवान गोपाळकृष्णाचे विठ्ठलरूप मानण्यात येते. तो भीमातीरी भेटीसाठी कायम उभा असतो. ग्यानबा तुकारामाच्या गजरात पांढरी दुमदुमते. दिंड्या-पताकांचे भार वाळवंटात उतरवतात. संतांची मांदियाळी भरते. |
|