सज्जनगड हा किल्ला सातारा येथे वसला आहे. हा एक डोंगरी किल्ला असून समुद्रसपाटीपासून ह्याची उंची ३३५० फूट आहे.
इतिहास
ब्रम्हणीच्या राजांनी १३४७-१५२७ मध्ये सज्जनगड किल्ला बांधला. १५२७-१६८७ मध्ये सज्जनगड किल्ला आदिलशाहच्या ताब्यात आला. मुघलांनी आदिलशहाला हरवून किल्ला ताब्यात घेतला. २ एप्रिल १७८३ मध्ये शिवाजी महाराजांनी सज्जनगड काबीज केला. ह्या किल्ल्याला आधी परळी म्हणत परंतु शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकल्यानंतर ह्या किल्ल्याला सज्जनगड नाव दिले. नंतर १८१८ मध्ये किल्ला ब्रिटिशांनी काबीज केला. संत रामदासांचे शेवटचे निवासस्थान सज्जनगड होते. (१७ व्या शतकात)
वैशिष्ठ्ये
सज्जनगड हे एक यात्रेचे ठिकाण आहे.
सज्जनगडावर रामदास स्वामी यांची समाधी आहे.
सज्जनगडावर घोडाळे तलाव आहे जे त्या काळी घोड्यांसाठी वापरत.