राजगड हा महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात वसलेला किल्ला आहे. राजगडाची समुद्रसपाटीपासूनची उंची ४६०० फुट (१४०० मी.) इतकी आहे.
इतिहास
राजगड हा मुरुंबादेवी डोंगरावर बांधलेला आहे.१६४७ मध्ये शिवाजी महाराजांनी राजगड ताब्यात घेतला. शिवाजींचे पुत्र राजाराम यांचा जन्म येथेच झाला तसेच शिवाजी महाराजांची पत्नी सईबाई यांचा मृत्यू येथेच झाला. आग्र्याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटून महाराज राजगडावरच आले. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या करारामध्ये शिवाजी महाराजांनी जे १७ किल्ले आपल्याजवळ ठेवले त्यापैकी एक म्हणजे राजगड. १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेला.
वैशिष्ठ्ये
राजगड हा बाले किल्ला आहे.
राजगडावर दोन मंदिरे आहेत. एक पद्मावती व दुसरे छोटे मंदिर आहे.