पन्हाळा किल्ला हा महाराष्ट्रात कोल्हापूर पासून २० किमी. अंतरावर आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासुनची उंची २७७२ फुट (३४५ मी.) इतकी आहे .
इतिहास
पन्हाळा हा किल्ला शिलाहाराचे अधिकारी भोज दुसरा यांनी बांधला. १२०९-१२४७ काळात यादवांच्या ताब्यात पन्हाळा हा किल्ला आला. १४८९ मध्ये आदिलशहाच्या हा विजापूर मध्ये हा किल्ला आला. १६५९ मध्ये अफझलखानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकला. मी १६६० मध्ये आदिलशहा दुसरा याने सिद्दी जौहरच्या नेतृत्वाखाली पन्हाळगड जिंकण्यासाठी सैन्य पाठवले. ५ महिन्याच्या सैन्याच्या वेढ्यानंतर शिवाजी महाराज पकडले जाण्याची भीती होती. शिवाजी महाराजांनी या परिस्थितीत काही मावळे निवडले, त्यातील एक होता बाजीप्रभू देशपांडे. १३ जुलै १६६० मध्ये शिवाजी महाराज पन्हाळगडावरून विशालगडाकडे जाण्यास निघाले. बाजीप्रभूंनी प्राणांची परवा न करता सिद्दी जौहरच्या सैन्याशी लढाई केली. शिवाजी महाराज सुटले परंतु किल्ला आदिलशहाकडे गेला. १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला कायमचा काबीज केला.
वैशिष्ठ्ये
पन्हाळा दख्खनच्या मोठ्या किल्ल्यांमधील एक पन्हाळगड या किल्ल्याची परिमिती १४ किमी.आहे.
पन्हाळा किल्ल्याचे बरेचसे कोरीव काम विजापूर पद्धतीचे आहे.
पन्हाळगडावर अंधार बावडी, कालावातींचा महाल, अंबरखाना, सज्जा कोठी, तीन दरवाजा, वाघ दरवाजा, राजदिंडी बुरुज अशी अनेक ठिकाणे किल्ल्यावर पाहण्याजोगी आहेत.
तसेच पन्हाळ्यावर सोमेश्वर, अंबाबाई, महाकाली देवी ह्यांची मंदिरे आहेत.