शिवाजी महाराजांच्या राज्याची राजधानी असलेला रायगड हा महाराष्ट्रातील एक डोंगरी किल्ला आहे जो महाड येथे वसलेला आहे. रायगडाची उंची २७०० फुट इतकी आहे.
इतिहास
रायगड किल्ल्याचे मुल नाव रायरी असे आहे जो १०३० साली चंद्रराव मोरे यांनी बांधला होता. रायगडला अतिशय खास असा इतिहास आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक येथेच झाला व त्यांचा मृत्यूही येथेच झाला.
वैशिष्ठ्ये
रायगड किल्ला सह्याद्री पर्वतरांगांतील आहे.
रायगडला अंदाजे १७३७ पायऱ्या आहेत.
'महादरवाजा' हे रायगड किल्ल्याचे प्रमुख द्वार आहे. महादार्वाज्यावर दोन कमळाची फुले कोरलेली आहेत.
रायगडावर नगारखाना, जगदीश्वर मंदिर, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, मेन दरवाजा, पालखी दरवाजा, वाघदरवाजा, हिरकणी बुरुज, शिवाजी महाराजांची समाधी अशी बरीच ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
जीजाउंची समाधी रायगडाच्या पायथ्याशी आहे.
वाघ्या ह्या शिवाजी महाराजांच्या कुत्र्याची समाधी देखील रायगडावर आहे.